जून महिन्याची संध्याकाळ. नायकाने नायिकेला फ़ोन केला. " @@@, कळत नाही काय करावं ? आत्ता जुलै मधे येऊ का दिवाळीत येऊ ? ". दोघेही हा विचार करून - करून थकले होते. काही सुचेना दोघाना.
नायिका म्हणाली, "अरे मॉम काय म्हणतेय ?"
नायक : "दिवाळी" , एक चिंताग्रस्त उत्तर !
नायकाच्या आईची इच्छा की त्याने दिवाळीत यावे. काय चूक आहे यात ? कोणत्याही आईला वाटणारच आपल्या मुलाने दिवाळीत घरी असावे , त्यात मागची दिवाळी चुकलेली , मग तीव्र इच्छा ! नायकाची आई तिच्या जागी एकदम बरोबर ...
नायक आणखिन confused ... डिसेम्बर नंतर जवळ - जवळ ५-६ महीने उलटलेले ... प्रेयसीला भेटल्याशिवय करमत नाहिये आणि आईला नाही पण म्हणवत नाहिये. नाही म्हणण्याचा प्रश्न येतोच कुठे ? नायकाला पण जुलै आणि दिवाळीत अशी दोन्ही वेळी यायची इच्छा ... आता "इच्छा तेथे मार्ग " ही म्हण जरी खरी असली तरी ती फ़क्त फ़ळ्य़ावर ! दोन्ही वेळेला येता येणं तर शक्यच नव्हतं. नायक कधी पण यायला तयार ! दिवाळीच्या कड़े त्याचा कल. त्याचाही काय चुकल?
मराठी माणसाला अमेरिकेत पणत्या न लावता दिवाळी साजरी करायला सांगणे .... त्यापेक्षा करुच नये ना ! नायक त्याच्या जागी एकदम बरोबर ...
नायिका आणखिन confused !! काही कळत नव्हत. दोन मुद्दे डोळ्यासमोर आले :
१. दिवाळी plan ला संमती दर्शविणे :
यात नायिका बरीच अस्वस्थ होती ... करण गेल्या १० वर्षात ठरला नाही तो फॅमिली ट्रिप च मुद्दा घरी निघालेला ...
" दोन वर्षात तू जाशील, मग आपली अशी ट्रिप होणारच नाही कधी ! जाऊ आपण केरळला ! " - नायिकेचे वडिल
घरातले सर्व खुश झाले , वा बऱ्याच दिवसानी ट्रिप ठरते आहे. नायिकेला कळत नव्हत. ती रात्रीच सांगणार होती नायकाला की दिवाळी मधेच ये !
आता काय करावे कळेना. आई - बाबांना नाही म्हणणे शक्य नाही , पण नायकावर जिवापाड प्रेम. त्याने दिवाळीत यावं अशी दडलेली इच्छा.
आणखी एक मुद्दा , ज्यामुळे निश्चित निर्णय घेता येइना. नायिकेच्या बहिणीची CA ची परीक्षा ! आता या परीक्षेत जर पूर्ण यश मिळाला तर ट्रिप च प्लान फत्ते
होणार. पण आत्ता याची खात्री काय ? नक्की ट्रिप होणार का नाही ?
बहिण, " जर माझे दोन्ही पेपर सुटले तरच जायचे " .
आता नायिकेचे आई, बाबा आणि बहिण आपल्या जागी बरोबर !
२. जुलै ला संमती दर्शविणे :
हे नायिकेला ला चालणार होतं. कारण सुट्टी होती त्यात बाकी कोणालाच काहीच आक्षेप नव्हता. दिवाळीत नाही म्हणलं तरी सुट्टीचा प्रॉब्लम आला असता.
१५ दिवस सलग सुट्टी ? जरा अवघडच होतं. लेकचर्स ची काही चिंता नव्हती ... पण sysad-गिरी ? कोणीही एडजस्ट करायला तयार होत नाही. त्यात जर कोणत्या प्रोजेक्ट नी डोक वर काढलं असतं तर पुन्हा अवघड परिस्थिति झाली असती .
हा प्रॉब्लम नायिका सांगणार तरी कोणाला ? नायकाला पण हा प्रॉब्लम विशेष पटत नव्हता. त्याचं म्हणणं तिसरया सेम ला काही काम नसतं. पण नायिकेच्या बाबतीत तशी परिस्थिति नव्हती. आत्ता जर दिवाळीत येण्याला संमती दाखवली असती
आणि नंतर ... केरळ चा प्लान ठरला असता किंवा सुट्टी नसती मिळाली तर पुन्हा नायकाची चिड - चिड होणार ... अर्थात नायिकेची पण !
सर्व बाजुंचा विचार करून , शेवटी नायिकेने ठरवले जुलै ला संमती द्यायची. Safest option is the BestEST option !
नायिका आपल्या जागी बरोबर ... ... "बहुतेक" ??
पुन्हा चर्चा सुरु. नायक अणि नायिका यांचे रोज फ़ोन वर यावरच वाद / चर्चा. शेवटी नायिकेने सांगितले "मला जुलै ऑप्शन बरा वाटतोय, तरी पण मॉम ला वाटत असेल दिवाळीत यावे, तर ये दिवाळीत. बघू काय होइल ते होइल. आपल्याला आत्ता एडजस्ट केलेच पाहिजे ... आणि करुयात ... नंतर आयुष्य आपलेच आहे ". नायकाला काही विशेष मान्य होत नव्हते मात्र नायिकेला मनातून कळत होते ... प्रेमी युगुल आपापल्या आई - वडिलांचे मन मोडायला तयार होत नाहीयेत.
एक दिवस नायकाचा नायिकेला फ़ोन , " एक चांगली बातमी आहे. उड्या मारायच्या नाहीत".... नायिका बातमी ऐकण्यास आतुर ... "बहुतेक जुलै ठरते आहे. मेनेजर म्हणाला ओक्ट. मधे काही काम(रिलीज़ ) असेल तर दिवाळीत फार सुट्टी नाही मिळणार. पाहिजे तर आत्ता १५ दिवस जा , आणि दिवाळीत ८ दिवस"
नायकाने खुशीने विमानाचे बुकिंग करून टाकले. नायिका खुश ... पण मनात एक विचार डोकावला "जुलै मधे यायला हा मुलगा इतका खुश झाला, याची इच्छा तरी काय होती ? जुलै का दिवाळी ?" ... थोडा वेळ उगाच विचार करून नायिकेने पण विचाराला उडवून लावले. आणि कामाला लागली. खुश होऊं उगाचच त्या दिवसाची तारीख, वेळ पुन्हा पुन्हा पाहू लागली, जणू काही प्रत्येक मिनिटाला दिवस सरणार होते. वेडीच ती त्याच्यासाठी ! जी-मेल च्या स्टेटस वर लगेच काउंटर सुरु झाला.
आयुष्यात उधाण आले. फ़ोन वर पुन्हा गोड चर्चा सुरु झाल्या, त्या १५ दिवसात .. हे करू ... ते करू ...
१३ जुलै , नायकाचे मुंबई विमानतळावर आगमन ... नायिका वाट बघत उभीच ! ७ एक महिन्यांनी मिलन ...
१५ दिवस मजेत गेले ...कळले पण नाही कसे सरले दिवस ... काही "विशेष" क्षणांची साथ घेउन नायक निघाला ... पुन्हा तीच ताटातूट ...
८ दिवस गेले ... दोघे आपापल्या कामात गुंतले ... विडियो चाट , फ़ोन पुन्हा चालु झाले ... वाट पाहू लागले पुढच्या "विशेष" क्षणांची ...
नायिकेच्या घरी ट्रिप ची आखणी सुरु झाली. एक नवा पर्याय पुढे आला , सिंगापूर !!! सर्व खुश :-) प्रश्न बाकी होता तो बहिणीच्या रिझल्टचा ..
ऑगस्ट ३१ ला नायिकेच्या बहिणीचा रिझल्ट लागला .... दुर्दैवाने एक ग्रुप सुटला दूसरा राहिला ... आणि नोव्हेम्बर मधे पुन्हा परीक्षा देणं आलं .
झालं ... ज्याची शंका होती अगदी तसाच झालं ... फॅमिली ट्रिप चा प्लान बारगळला.
नायिका अस्वस्थ झाली ... तिला वाटत होतं साडेसाती संपली .. आता सगळ चांगलं होइल ... पण पुन्हा तिच्या नशिबाने दगा दिला.
नायिकेचा सेफ गेम चुकला .
नायक आणि नायिका फ़ोन वर ...
नायक : " आई आज म्हणत होती, त्यांचा केरळ प्लान cancel झाला वाटतं ... आला असतास बाबा दिवाळीत"
नायिका : "अरे मला कळतय रे मॉम ला काय वाटतय ... पण मला आधी कसं कळणार की असं सगळ होइल. मला समजुन घे रे !!"
नायक : "हो गं, मी तुला दोष देत नाहिये ... आणि तूला दुखावत पण नाहीये. मला फ़क्त मन मोकळ करायचय. शेवटी येवढच आहे की मला पण येता आलं नाही आणि तुम्ही पण कुठे गेला नाहित."
नायिका २ दिवस विचार करते यावर. दिवस रात्र हाच विचार , झोप नाही , कामात लक्ष्य नाही ... फ़क्त येवढाच विचार ... चुकलं कुठे ? चुकलं कोणाचं ? चिडावे तरी कोणावर ?
नायक ... बरोबर ...
नायकाची आई ... बरोबर
नायिकेचे आई वडिल , बहिण .... बरोबर ...
आणि नायिका ?? .... बरोबर .... "बहुतेक" ... !!!
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Subscribe to:
Post Comments (Atom)

kiti samanjas ahes ga bala!!!
ReplyDelete